Pandharpur Wari | दोन वर्षांनंतर आषाढी पायी पालखी सोहळा होणार ; २१ जूनला पालखीचे प्रस्थान , वाचा वेळापत्रक
गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले होते. परंतु, आज दोन वर्षांनी महाराष्ट्र कोरोनामुक्त झाला. यामुळे राज्यातील धार्मिक कार्यक्रमासह इतर कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे होत आहेत. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण असून, वारकरी तयारीलाही लागले आहेत.

Pandharpur Live Online:
गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले होते. परंतु, आज दोन वर्षांनी महाराष्ट्र कोरोनामुक्त झाला. यामुळे राज्यातील धार्मिक कार्यक्रमासह इतर कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे होत आहेत. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण असून, वारकरी तयारीलाही लागले आहेत. येत्या २१ जूनला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. पंढरीनाथाच्या पंढरीमध्ये एकादशीच्या आदल्या दिवशी झालेल्या बैठकीत पायी वारीचे वेळापत्रक सादर करण्यात आले आहे.
आषाढी पायी पालखी सोहळ्याचा आयोजित कार्यक्रम.
मंगळवार २१ जून रोजी सायंकाळी ४ वाजता श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आळंदी येथून प्रस्थान होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा
- मंगळवार २१ जून २०२२ रोजी आळंदी येथून प्रस्थान
- बुधवार २२ जून आणि गुरुवार २३ जून रोजी पुणे
- शुक्रवार २४ जून आणि शनिवार २५ जून रोजी सासवड
- रविवार २६ जून रोजी जेजुरी, सोमवार २७ जून रोजी वाल्हे
- मंगळवार २८ जून आणि बुधवार २९ जून रोजी लोणंद
- गुरुवार ३० जून रोजी तरडगाव, शुक्रवार १ जुलै आणि शनिवार २ जुलै रोजी फलटण
- रविवार ३ जुलै रोजी बरड, सोमवार ४ जुलै रोजी नातेपुते, मंगळवार ५ जुलै रोजी माळशिरस
- बुधवार ६ जुलै रोजी वेळापूर, गुरुवार ७ जुलै रोजी भंडीशेगाव
- शुक्रवार ८ जुलै रोजी वाखरी
- शनिवार ९ जुलै २०२२ रोजी श्री क्षेत्र पंढरपुर मुक्कामी पालखी सोहळा पोहोचणार
- रविवार १० जुलै २०२२ रोजी आषाढी एकादशीचा महासोहळा होणार
- पालखी सोहळ्यात चांदोबाचा लिंब , बाजीराव विहीर व इसबावी येथे उभे रिंगण
- पुरंदावडे (सदशिवनगर), पानीव पाटी, ठाकुरबुवा व बाजीराव विहीर येथे अश्वांचे गोल रिंगण
- पालखी सोहळ्यासोबत वारीत सहभागी होणार असलेल्या वाहनांना पोलिसांकडून परवाने (पास) दिले जाणार. फक्त परवानाधारक वाहनांनाच पालखी सोहळ्यासोबत वारीत सहभागी होता येणार.
- संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात रथापुढे २७ आणि रथामागे २५१ नोंदणीकृत दिंड्या असणार. नोंदणी नसलेल्या आणखी १२५ ते १५० दिंड्याही पालखी सोहळ्यात सहभागी होण्याची शक्यता. पोलीस परवानगी आणि पालखी सोहळा संस्थानशी समन्वय साधून या दिंड्या सहभागी होणार.
शनिवार 9 रोजी श्री क्षेत्र पंढरपूर मुक्कामी पालखी सोहळा पोहोचेल. रविवार 10 जुलै रोजी आषाढी एकादशीचा महा सोहळा होणार आहे.
पालखी सोहळ्यात चांदोबाचा लिंब बाजीराव विहीर आणि इसबावी येथे उभे रिंगण तर पुरंदावडे (सदाशिव नगर) , पानीव पाटी, ठाकुरबुवा, बाजीराव विहीर येथे अश्वांचे गोल रिंगण सोहळा होणार आहे.